postbox media

Showing posts with label दगडफुल आणी माळरानावरचा पाउस. Show all posts
Showing posts with label दगडफुल आणी माळरानावरचा पाउस. Show all posts

Friday 4 October 2019

दगडफुल आणी माळरानावरचा पाउस





'दगडफुल" आणी "माळरानावरचा पाउस" !!

 


(सत्य घटना )
सिदगोंडा आण्णासो पाटील, खानापुर तालुक्यातील 'बेळगाव' जवळच्या अतीदुर्गम खेड्यातुन पायपीट करत उदर निर्वाह करणारया महाराष्ट्रातील तमाम 'भटक्या' आणी 'विमुक्त' जातींचे प्रतीनिधीत्व करणारया महाराष्ट्राचा खरा 'आरसा' म्हणा किंवा 'बोलका चेहरा'
'आसवेच' स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली'..या ओळींचा प्रत्यय वास्तवात येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे खरे तर..
घरोघरी फिरुन दारोदारी जावून स्त्रियांच्या साठवून ठेवलेल्या केसांच्या पुंजक्यांच्या बदल्यात त्या त्या स्त्रियाना पिना,चाफ,गोंडा,कंगवा,रिबीन,टिकल्या आणी इतर साज व केशशृंगारीक वस्तु मोबदल्यात देण्याचे काम कंत्राटदाराकडुन या पोरांच्या हातुन केले जाते. या जमलेल्या केसांचा पुढे केसावळ,गंगावण तसेच तत्सम कुत्रिम केशनिर्मीती साठी उपयोग केला जातो असे सिदगोण्डा ने सांगीतले. हे सर्व जमा करताना फिरताना पंधरा ते वीस गावे पायी विना चप्पल तुडवून झाली की परतीच्या घराकडे खोपेच्या प्रवासाला निघायचे. घरातुन 'डबा' 'शिदोरी' असे कधीच नसते.वाटेत जे जे मिळेल ते ते खाणे आणी पोटापाण्यासाठी फिरणे. मध्येच उस खाउन पोट भरने,कोणाच्या शेतातुन हरभरा काढुन खाणे ,कोणी भाकर चटनीचा तुकडा दिला तर खुशीने घेणे, बोरवेल तसेच रस्त्यालगतच्या विहीरीतुन पाणी काढुन पिणे असे राज रोस चालत असे, कधी कधी तर मोकाट कुत्री गावात भुंकत मागे लागत मग अशा वेळी हातात दगड घेवून मी फिरत असतो असे सिदगोंडा सांगत होता.त्याच्या सारख्याच अनेक भटक्या आणी विमुक्त जातींच्या समाजातील लोकांची , त्यांच्या अनेक प्रश्नांची स्वातंत्र्या नंतर ही उत्तरे ना त्या 'समाजाला मिळालीत ना आजवरच्या 'सरकारला'
त्यांच्यातल्या त्या समाजातल्या चाळीशीतल्या तरुणाला सही कर म्हण्टले तरी 'मी अंगठा लावतो' असे तो बिंदिक्कत पणे तो सांगतो.
आज 'सावित्रीबाई फुले' आणी 'ज्योतीराव फुले' यांची शिक्षणाची गंगा महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात पोहोचली असे म्हणताना ही अशी उदाहरणे मन सुन्न करुन जातात. आपण भारतीय आज 'मंगळावर' पोहोचलो पण 'बेळगाव' आणी सिमाभागातील लोकांच्या प्रश्नांवर आणी त्यांच्या मुलभुत प्रश्नांपर्यंत पोहोचणे ना 'केंद्र सरकारला' शक्य होत आहे ना 'राज्य सरकारला'. मधल्या मध्ये 'सॅण्डवीच' झाल्या सारखी अवस्था झालेल्या या पुढच्या पिढीतल्या पोरांची जी दुर्दशा आज आहे ती पुढे खुप मोठे 'शाप' घेवून जन्माला येणार यात शंकाच नाही.
आजची सिमाभागातल्या भटक्या आणी विमुक्त समाजातल्या पोरांची निरागसता जावून 'अन्यायाची' भावना इतकी तीव्र होईल की कोणाही राज्यकर्त्याकडे याचे उत्तर नसेल.
'आपल्याच घरी हाल सोसते मराठी'..कवितांच्या ओळी सारख्या आठवत होत्या..
बेळगावच्या सिदगोंडाशी खुप गप्पा मारल्या..धरणाच्या पाटावरचे काम सध्या थंड आहे.म्हणुन इतकी पायपीट करुन पोट भरायला फिरावे लागते..आज सिदगोंडा सारखी अनेक जिवंत उदाहरणे आपल्याच जवळपास असतात फक्त काही बाजारु वर्तमान पत्रात सेलीब्रीटींच्या घरांचे इंटीरीयरचे काम,सुविधा,खाणे पिणे, आणी मुलाखतीचे रकाणे यामुळे दरवेळी कव्हर केलेली एका जातीवंत पत्रकाराची मुलाखत छापुन यायाला..संपादकांची पुढची तारीख तारीखच असते...ही खरी आजच्या पत्रकारीतेची शोकांतीका..
दगडफुलासारखी निरागसता सिदगोंडाच्या नजरेत होती.
तो निघुन गेला..त्याच्या पाठमोरया आकृतीकडे मी नुसताच पाहत होतो..धुळीत पाय माखले होते एव्हाना तो माळरानापर्यंत पोहोचला पण ..मान खाली घालुन त्याचे चालत रहाणे मला कुठे तरी लागले मनाला..हळु हळु त्याची पाठमोरी अंधुकशी आकृती दिसु लागली..माळराना वर पाउस दाटुन आला होता,गडद काळोखा ढग दाटुन आलेला पाउस निष्ठुर पणे हळु हळु बरसु लागला..तो तसाच पावसात हळु हळु पाउले टाकत चालत होता.आता माझे डोळे ओले पाणावले होते...माळरानावर कुठेही आडोसा न्हवता...भिजत भिजत तो तसाच चालत हळु हळु दिसेनासा झाला..त्या दिवशी माळरानावर पडनारा तो निष्ठुर पाउस त्या पोरापुढे खुपच खुजा, कोरडा आणी लहान वाटला.



वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com