नमस्कार
आज आपण बघुया उपवासाची कचोरी
साहित्य :-
पारी साठी
४-५ मोठे उकडलेले बटाटे किसून घ्यावे
२ चमचे साबुदाणा पीठ
मीठ
सारणा साठी :-
२ वाटीओला खवलेला नारळ
१/२ वाटी कोथंबीर बारीक चिरलेली
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१०-१२काजू तुकडे केलेले
१०-१२ मनुका
१ चमचा लिंबू रस
मीठ
साखर
तूप /तेल
कृती: -
सारणा साठी :-
एका भांड्या खववलेला नारळ, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, काजू,मनुका, लिंबू रस, चवीप्रमाणे मीठ व साखर घालून हेय सारण एकजीव करून घ्या .
पारी साठी :
एका ताटात किसलेला बटाटा घ्यावा . मग त्यामध्ये साबुदाणा पीठआणि थोडं मीठ घालून ते चांगलं मळून घ्या, मग त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून त्यामध्ये नारळाचे सारण भरून गोळा बंद करा.
कढईमध्ये तूप/तेल गरम करून मंद आचेवर कचोऱ्या तळून घ्याव्यात.
आपल्या उपवासाच्या कचोऱ्या तयार
टीप:-
१)काही जण उपवासाला कोथिंबीर खात नाही तर ती नाही घातली तरी चालेल
वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com
No comments:
Post a Comment