नमस्कार
आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत
व्हेज बिर्याणी
साहित्य :
★भातासाठी-
१ १/२पेला बासमती तांदूळ
३ पेले पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलची, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी,१चक्री फूल)
★रस्सा भाजी साठी -
मसाला वाटण १ :- २-३चमचे आलं लसूण पेस्ट , २ हिरव्या मिरच्या, १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा खसखस
★मसाला वाटण २ :- १ चमचा धने, १ चमचा शहाजिरे / जिरे, ३-४ लवंगा, ५-६ काळी मिरी, १' दालचिनीचा तुकडा
तळण्यासाठी-, ३-४उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू
★भाज्या -१ बारीक चिरलेला कांदा, फ्लॉवरचे ६-७ तुरे, १/४ वाटी मटार, २ बटाट्याच्या चोकोनी फोडी
१/४ वाटी उभे चिरलेले गाजर, १/४ वाटी सिमला(भोपळी) मिरचीचे चौकोनी तुकडे, १/२वाटी फरसबी चिरलेली
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ तमालपत्र
३ चमचे तेल
मीठ चवीप्रमाणे
केवडा इसेन्स
केशर चिमुटभर आणि ४ चमचे दुध
कृती :
१)सर्व प्रथम तांदूळ १० -१५मिनिटे आधी धुवून ठेवा. २)एका पातेल्यात २ चमचे तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट (इथे २ १/२ पेला ) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.
३) भात पूर्ण शिजला कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे. म्हणजे नंतर थर करताना मोकळा होईल.
४) एकीकडे कढईत तेल गरम करा. तेलात काजू तळून घ्या.काजू लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
५) नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर रस्सा भाजी साठी त्याच्यातच ठेवून द्या.
६)खसखस गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे ती शिजेल.
७)मसाला वाटण no.१ मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
८) मसाला वाटण no.२ ची बारीक powder करून घ्या.
( तयार गरम मसाला पावडर १/४ चमचा वापरली तरी चालेल.)
९)एका पातेल्यात तळणीचे तेल घ्या त्यात तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
१०)मग मसाला वाटण no.१ घालून परता. खमंग वास सुटला कि. मसाला वाटण no.२ घालून परता.
११) १-२ मिनिटे परतल्यावर हळद मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
१२) मग बटाटा ,फ्लॉवर, गाजर, मटार, सिमला मिरची अनुक्रमे घालून १ १/२ कप पाणी घाला. वरून झाकण ठेऊन भाज्या छान शिजू द्या.
१३) रस्सा तयार झाला कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर खलून ठेवा.
१४) नंतर पातेल्यात सर्वात खाली भाताचा थर करा.त्यावर तळलेला कांदा, काजू घाला. वरती भाजीचा थर करा. मग परत भाताचा थर.वरती कांदा काजू , वरती भाजीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काजू , कोथिंबीर घालून सजवा.
१५)थरांना चमच्याच्या दांड्याने वेगवेगळ्या जागी ३-४ छोटी भोकं पाडा. त्यातून केशरी दुध आणि १ झाकण केवडा इसेन्स घाला. भोक बुजवा आणि झाकण ठेऊन १-२ वाफा काढा.
१६)बिर्याणी उभा डाव घालून. थर न मोडता वाढा.
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/
No comments:
Post a Comment